केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क ४०% वाढवल्यामुळे शेतकरी संघटनेचा उद्या रास्तारोको व हजामत आंदोलन

1 min read

ओतूर दि.२३:-देशातील व राज्यातील शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात असलेली कुचंबना व अवहेलना पाहता कांद्याचे बाजार भाव फार मोठ्या प्रमाणात ढासळलेले होते. परंतु कुठेतरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने आता सुगीचे दिवस येत असताना बाजारभाव प्रति किलो पंचवीस – तीस रुपये आले असताना केंद्र सरकारने अचानक ४० टक्के निर्यात शुल्क वाढ केली हे निश्चितपणे शेतकऱ्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने लादलेले ४० टक्के निर्यात शुल्क वाढ तात्काळ रद्द करण्यात यावे. जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून बाजार भाव वाढत असताना हा निर्णय चुकीचा आहे. केंद्रीय कृषिमंत्री यांना या शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे सूचित केले आहे. त्या अनुषंगाने गुरुवार दि. २४ ऑगस्ट रोजी ओतूर मार्केट यार्ड ते मोनिका चौक (ता. जुन्नर, जि. पुणे) सकाळी १० वाजता समस्त शेतकरी बांधव, शेतकरी संघटना, सह्याद्री शेतकरी संघटना, शिवनेरी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने रास्ता रोको व हजामत आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती जुन्नर तालुका शेतकरी संघटनेचे युवा अध्यक्ष प्रमोद केरभाऊ खांडगे पाटील यांनी दिली.तसेच सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे