केंद्रीय कृषीमंत्री आणि राज्याच्या कृषीमंत्र्यांनी जुन्नरच्या शेतकऱ्यांशी साधला संवाद

1 min read

नारायणगाव दि.३:- जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, आणि राज्याचे कृषीमंत्री माणिक कोकाटे यांचे जुन्नरकरांच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.केंद्र सरकारच्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत हे मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत.या उपक्रमाअंतर्गत मान्यवरांनी नारायणगाव येथील ‘हस्ताई अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी’ ला भेट दिली. शेतकरी बांधवांसोबत थेट संवाद साधत उत्पादन, तंत्रज्ञान व शेतीच्या नव्या संधींवर मार्गदर्शन केले.हा संवाद केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या प्रगतीचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे