श्री क्षेत्र मढी ते मायंबा रोपवे मंजूर; पर्यटनाला मिळणार चालना

1 min read

पाथर्डी दि.२७:- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र कानिफनाथ गड (मढी) ते श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड (मायंबा) या साडेतीन किलो मीटर लांबीच्या रोपवेच्या कामास केंद्रीय परिवहन व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राष्ट्रीय रोपवे कार्यक्रम पर्वतमाला योजनेअंतर्गत तत्वत: मान्यता मिळाली. असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली. आमदार राजळे म्हणाल्या, श्री क्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथ समाधी मंदिर असून चैतन्य कानिफनाथ मंदिरापासून जवळच श्री क्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथ महाराज यांचे समाधी मंदिर आहे.या दोन्ही देवस्थानच्या गडांना जोडणाऱ्या डोंगर रस्त्याचे अंतर नऊ किलोमीटर आहे. परंतू हवाई अंतर ३.६ किलोमीटर आहे. या उपक्रमामुळे भाविकांच्या वेळेची बचत होवून पर्यटनाला चालना मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे