“राज्याच्या संचालक आत्माचा जुन्नर तालुक्यातील सेंद्रिय शेती गटास भेट दौरा”
1 min read
जुन्नर दि.२९:- आत्मा महाराष्ट्र राज्य संचालक अशोक किरनळी, सुरज मडके प्रकल्प संचालक आत्मा पुणे यांनी जुन्नर तालुक्यातील डॉ, पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत स्थापन झालेल्या श्रीलक्ष्मी महिला सेंद्रिय गट बोरी (ता. जुन्नर) या गटात भेट दिली. व गटातील शेतकऱ्यांच्या शेतावर सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या पिकाची पाहणी केली. यामध्ये इनोव्हा बायोटेक कंपनीचे कंपोस्ट कल्चर वापरून केलेले ऊस पिकातील पाचट व्यवस्थापन तसेच बाबाजी बांगर यांनी सेंद्रिय पद्धतीने केलेली.
वांगी पिकाची लागवड त्यात आयपीएम आयपीएल साठी वापरलेले विविध सापळे चिकट सापळे कामगंध सापळे सोलर ट्रॅप व त्याचा त्यांना झालेल्या फायदा व अनुभव बाबाजी बांगर यांनी संचालकांना सांगितला सेंद्रिय शेती करत असताना बाबाजी बांगर यांना आलेला अनुभव व त्यांना मिळालेला
बाजार भाव यावर ते समाधानी असल्याचे त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत मिळालेल्या प्रात्यक्षिकातून त्यांनी पाच ड्रम मध्ये जैविक निविष्ठा तयार केल्या. त्यामध्ये जीवामृत दशपर्णी अर्क विविध अर्क तसेच विविध जिवाणू स्लरी तयार करून.
आपल्या शेतामध्ये त्यांचा वापर केला. त्याच्यापासून त्यांना खूप फायदा झाला असे त्यांनी सांगितले. तसेच आता ते त्या युनिटचा वापर करून गटातील इतर शेतकऱ्यांना या सर्व निवीष्ठांचा वापर करण्यास प्रोत्साहीत करत आहेत व गटातील इतर सदस्यांना त्याचा फायदा होत आहे.
श्री लक्ष्मी महिला सेंद्रिय बचत गट या नावाने डॉ पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत 50हेक्टर क्षेत्राचा एक गट स्थापन करून 50 हेक्टर क्षेत्रावर गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे प्रोत्साहित करत आहेत गटातील सर्व महिला शिक्षित असून प्रगतिशील महिला शेतकरी आहेत अशी माहिती गटातील सदस्य सारिका चिंचवडे कृषी पदवीधर यांनी स्वतः दिली.
यावेळी उपस्थित प्रगतिशील ऊस उत्पादक शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांनी घेतलेल्या ऊस पिकाचे विक्रम उत्पादन व खोडवा व्यवस्थापन याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच प्रयोगशील शेतकरी उत्तम जाधव यांनी ऊस पिकाची सुपर केन नर्सरी मध्ये केलेले तालुक्यातील काम व त्याचा फायदा याविषयी संचालकांना माहिती दिली.
तसेच आत्मा अंतर्गत विविध प्रशिक्षणाचा तसेच कोईमतुर ऊस संशोधन केंद्र येथील आंतरराज्य प्रशिक्षणाचा शेतकऱ्यांना झालेला लाभ या विषयी आत्मा विभागाचे आभार मानले.या भेटीच्या वेळी संचालक आत्मा महाराष्ट्र राज्य अशोक किरनळी, प्रकल्प संचालक आत्मा पुणे सुरज मडके,
तालुका कृषी अधिकारी जुन्नर गणेश भोसले, मंडळ कृषी अधिकारी शिवकांत कोल्हे, कृषी सहाय्यक रानु आंबेकर, मुकेश महाजन, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सूर्यकांत विरनक तसेच सृजनशील शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक काशिनाथ आवटी, ऋषिकेश कोकाटे,
उत्तम जाधव, विकास चव्हाण, संपत चिचवडे, श्रीलक्ष्मी सेंद्रिय गटाच्या अध्यक्ष अनिता चिंचवडे सुनिता बांगर, वैष्णवी बांगर, जालिंदर पटाडे व गटातील तर सदस्य उपस्थित होते.