डिंभे धरण बोगदा होऊन देणार नाही:- आशा बुचके
1 min read
जुन्नर दि.१७:-डिंभे धरण बोगदा होऊन देणार नाही, कुकडी प्रकल्पातील 65 केटी बंधारे कायदेशीर करणार, चिलेवाडी कॅनॉल, वडज उपसा सिंचन कालवा,आणे पठार कालवा अनेक वर्षापासून चे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचं मत आशा बुचके यांनी व्यक्त केल.निवडणूक आली की डिंभे ते माणिक डोह बोगदा,वडज उपसा सिंचन कालवा,आणे पठार पाणी प्रश्न हे विषय समोर येतात.१)वडज धरणामधून उपसा सिंचन द्वारे मौजे विठ्ठलवाडी,धोंडकरवाडी सावरगाव खिलारवाडी एकनाथवाडी पाबळवाडी परिसरासाठी शेतीसाठी बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी मिळावे त्यासाठी संकल्पचित्र व ई टेंडर निघालेले नाही.
ते पूर्ण करणार तसेच पिंपळगाव तर्फे नारायणगाव गुंजाळवाडी आर्वी या गावांचा वडज उपसा सिंचन कालव्यात समावेश करण्यासाठी सर्वेसाठी मंजूरी आणणार २)आणे,नळवणे उपसा सिंचन द्वारे, गणेशवाडी विठ्ठलवाडी तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा पाठपुरावा चालू आहे.अनेक वर्षापासून प्रकल्प प्रलंबित आहे.तो पूर्ण करणार.
३)चिलेवाडी धरणातून बंदिस्त पाईपलाईन द्वारे चिलेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण,रोहकडी,ओतूर, डुंबरवाडी, खामुंडी, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद,आळेफाटा,आळे,राजुरी, गुंजाळवाडी,बांगरवाडी हा 39 किलोमीट प्रलंबित कॅनल आहे.तो पूर्ण करणार.खरी वस्तुस्थिती-अनेक वर्षांपासून हा बोगदा होऊ नये.
म्हणून शेतकरी तीव्र विरोध करीत होते ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्याबरोबर जुन्नर तालुक्यामधून जिल्हा परिषद सदस्य आशा बुचके त्यादेखील जुन्नरचे पाणी भूमिपुत्रांना प्रथम द्या नंतरच उरलेले पाणी अहमदनगर कर्जत जामखेड साठी द्या अशी भूमिका कायम मांडत होत्या.
मागील वर्षी कुकडी प्रकल्पात समाविष्ट असलेले केटी बंधारे नगर जिल्ह्यातील एका नागरिकाने बेकायदेशीर आहेत म्हणून याचिका दाखल केली जुन्नर, आंबेगाव तालुक्यामधून पाणी मागणी अर्ज भरले नसल्यामुळे त्या ठिकाणी हे केटी बेकायदेशीर ठरवले गेले शेतकऱ्यांना या काळात प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
व जुन्नर तालुक्यातील नद्यांना पाणी सोडण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला नद्यांना पाणी लेट सुटत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे तहाने माल जळून देखील या काळात गेले.मात्र प्रत्येक वेळेला श्रेयासाठी लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांना वेठीस धरत होते.
प्रत्येक महिन्याला शेतकरी संघटनेबरोबर शेतकऱ्यांना देखील नदीला पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या दाराशी जाऊन बसावे लागले. संघर्ष करावा लागला. हे शेतकरी विसरलेले नाही. अहमदनगरचे खासदार निलेश लंके व कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे डिंभे ते माणिकडोह बोगदा करण्यासाठी आग्रही आहे.
त्यामुळे योग्य तो लोकप्रतिनिधी निवडला गेला नाही तर पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागेल. पुढील काळामध्ये पाणी प्रश्न गंभीर होऊ शकतो या सर्व गोष्टी टाळण्यासाठी जुन्नर तालुक्यातून सक्षम विधानसभा लोकप्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे.अपक्ष उमेदवार आशा बुचके सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतात त्या शेती प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम देखील आहेत.
प्रतिक्रिया १
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या पाहिजे. शेतकऱ्यांना रास्त व किफाईतशीर हमीभाव, शेतीमालाला मिळाला पाहिजे,कांदे,साखर,बटाटे,इतर भाजीपाला,द्राक्ष, फळांवर निर्यात बंदी आहे निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवली पाहिजे.सोयाबीन शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे व्यापारी खरेदी करत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतो. जुन्नर तालुक्यामध्ये हमीभावाप्रमाणे खरेदी केंद्र महत्त्वाच्या ठिकाणी स्थापन झाली पाहिजे हे सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सौ.आशाताई बुचके या सक्षम नेतृत्वाची गरज आहे.
प्रमोद खांडगे पाटील,
अध्यक्ष पुणे अखिल भारतीय शेतकरी संघटना
——
प्रतिक्रिया २
जुन्नर तालुक्यातील पाणी प्रश्न गंभीर होत चाललेला आहे.कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अनेक वर्षांपासून मार्गी लावलेले नाहीत.मात्र शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळात गाजर दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक होते.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आशा बुचके या खंबीर नेतृत्वाची गरज आहे.
नंदकुमार चव्हाण, प्रगतशील शेतकरी