पंकज कणसे यूवा प्रतिष्ठान कडून दुष्काळग्रस्त पाच गावांना टॅंकरने मोफत पाण्याची सोय
1 min read
आणे दि.२९:- राजुरी उंचखडक (ता.जुन्नर) येथील पंकजभाऊ सोपान कणसे यूवा प्रतिष्ठानकडून आणे पठारावरील दुष्काळग्रस्त पाच गावांना मोफत पाण्याची सोय करण्यात आली आहे. जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत या गावांना असाच मोफत पाणीपुरवठा करणार असल्याचे पंकज कणसे यांनी सांगितले.
आणे, नळवणे, व्हरुंडी, शिंदेवाडी, पेमदरा, आनंदवाडी या सर्व गावांना प्रत्येक एका गावाला दिवसातून एक पाण्याची खेप दिली जाणार आहे. प्रतिष्ठान ने २५ हजार लिटर क्षमता असलेले हे पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे.
पंकज कणसे यांना मुबलक पाणी असल्यामुळे त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सदर पाणी हे आणे पठारावरील दुष्काळग्रस्त गावांना देण्याचे ठरवले. दुष्काळग्रस्त आणे पठारावर माणसांची व जनावरांची पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या भास होती.
शासकीय टँकर या भागाला पुरेसं नाही. गेले पंधरा ते वीस दिवस पंकज कणसे या पाच गावांचा सर्वे करत होते. या दरम्यान त्यांना गावच्या पाण्याची बिकट समस्या असल्याचे निदर्शनास आले.
या प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत या गावांना मोफत पाणीपुरवठा करणारं टँकर सोमवार दि.२९ रोजी आणे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते, पंकजभाऊ कणसे युवा प्रतिष्ठानचे पंकज कणसे, सामाजिक कार्यकर्ते बाबाजी शिंदे, अमोल शिंदे, पाटील गाडेकर,
आनंदा बेलकर, डॉ. दीपक आहेर, माऊली संभेराव,राम गगे ,रोहिदास शिंदे, किशोर आहेर, पांडू गाडेकर, प्रदीप आहेर, वैभव आहेर, रामदास गुंजाळ, आनंदा गुंजाळ, किसन गुंजाळ, मयूर गुंजाळ, निलेश वाळूंज, प्रवीण कणसे, भाऊसाहेब गुंजाळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी व ग्रामस्थांनी पंकज कणसे यांचे आभार मानले व यथोचित सत्कार केला.