कल्याण – नगर महामार्गावर लवणवाडीत अपघात प्रवण क्षेत्रात पांढरे पट्टे

1 min read

बेल्हे दि.११:- दुचाकीला पीकअप टेम्पोने दिलेल्या जोरदार धडकेत पाच जण ठार व एक गंभीर जखमी झाल्याची घटना नगर – कल्याण मार्गावरील लवणवाडी (ता.जुन्नर) येथे या वर्षी मार्च महिन्यात घडली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी येथे पांढरे पट्टे व अपघात प्रवण क्षेत्र असे बोर्ड लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार ८ मे रोजी अपघात प्रवण क्षेत्र असल्याचे बोर्ड लावण्यात आले. तसेच सोमवार दि.१० रोजी येथे पांढरे पट्टे (थर्माप्लास्टिक रंबल स्ट्रीप) मारण्यात आले. राजुरी येथेही एक दोन दिवसांत थर्माप्लास्टिक रंबल स्ट्रीप मारण्यात येणार असल्याची माहिती कल्याण – नगर महामार्ग जि.एस ग्रुप चे मॅनेजर सतीश बागल यांनी दिली.लवणवाडीत वारंवार अपघात होत असून ज्या ठिकाणी अपघात झाला आहे ती जागा लवणात असुन दोन्हीही बाजुने उतार असल्याने या जागेवर वारंवार अपघात झालेले आहेत. तसेच या ठिकाणी शाळा, दुध डेअरी, मंदिर लोकवस्ती असुन नेहमीच गर्दी असते. त्यामुळे या जागेवर पांढरे पट्टे मारावेत जेणे करून वाहनाचा वेग कमी होईल अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षगौरव कोकणे व ग्रामस्थांनी केली होती. हे पट्टे मारल्याने वाहनांचा वेग कमी होत आहे, त्यामुळे ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे