पीक विम्याचे दीड कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी भरले अर्ज:- कृषी मंत्री धनंजय मुंडे

1 min read

मुंबई, दि. २- शेतकरी बांधवांनी या खरीप हंगामात एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. आतापर्यंत दीड कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये, यासाठी ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. उर्वरित शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज तीन ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा असे आवाहन मुंडेंनी केले आहे.

पीक विमा योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पार पडते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पीक विमा भरण्यासाठीची वेबसाइट सतत हँग होत असल्याने शेतकऱ्यांना दिवसेंदिवस सीएससी सेंटरवर बसून राहावे लागत होते. अशातच पीक विमा भरण्यासाठी देण्यात आलेली शेवटची तारीख जवळ येत चालली होती. याच पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कृषिमंत्री मुंडे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष देऊन पीक विमा भरण्यासाठी वेबसाइट सुरळीत करून पीक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. राज्याची हीच विनंती मान्य करत आता पिक विमा भरण्यासाठी केंद्राकडून ३ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे