माळीण ची पुनरावृत्ती; इर्शाळवाडीवर कोसळली दरड; ५ जणांचा मृत्यू; ७५ जणांना काढले बाहेर;१५-१८ घरांवर कोसळली दरड; बचाव कार्य सुरू

1 min read

खालापूर दि.२०:- रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून दरड कोसळल्याने अनेक कुटुंब मलब्याखाली अडकले आहेत. बुधवार (दि.२०) रात्री ही दरड कोसळली आहे. रात्री मुसळधार पाऊस असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला होता. आता सकाळी उजाडल्यानंतर बचावकार्याला वेग आला आहे.

अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. आतापर्यंत ७५ जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांची संख्या वाढण्याची भीती असून १५- २० नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी दाखल झाले आहेत.


नातेवाईकांचा अश्रूचा बांध फुटला आहे. कुणाची मुलगी, कुणाचा भाऊ या मलब्याखाली अडकले आहेत. जिवाचा आकांत करुन लोक त्यांच्या नातेवाईकांना शोधत आहेत. एक बाप त्याच्या मुलीचा शोध घेत आहे. बदलापूर वरून मुलीला शोधायला आल्याचे खचलेल्या बापाने सांगितले.

त्याला प्रश्न विचारला असता त्याच्या डोळ्यात फक्त अश्रू होते.एनडीआरए जवानाचा मृत्यू बचावकार्य करताना एका एनडीआरए जवानाचा मृत्यू झाला आहे.

एनडीआरएफच्या 2 पथकांनी घटनास्थळी पोहोचून शोध आणि बचावकार्य करत आहेत.या गावात महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे हे रायगड जिल्ह्यातील खालापूरच्या इर्शाळवाडी येथे पोहचले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे