जुन्नर तालुक्यात रब्बी हंगामाला हवामान बदलाचा फटका

1 min read

बेल्हे दि.५:- गेल्या तीन चार दिवसांपासून जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात ढगाळ वातावरण असल्यामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. ढगाळ वातावरण धुक्याने शेतकरी पुन्हा जेरीस आला आहे. कांदा, गहू, हरभरा आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव हाेण्याची शक्यता आहे. सततच्या हवामान बदलामुळे जुन्नर तालुक्यातील रब्बी हंगामाला फटका बसत आहे. त्यात आता सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण असते. त्यामुळे कांद्यावर करपा, हरभऱ्यावर गाठी अळीचा प्रादुर्भाव हाेण्याची शक्यता आहे. त्यामळे शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. रब्बी हंगामातील गहू, तूर व हरभरा पिकांवर विविध किडींनी हल्लाबोल केल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या किडींच्या बंदोबस्तासाठी पुन्हा शेतकऱ्यांना किटकनाशक फवारण्याची वेळ आली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!