मुख्यमंत्र्यांची “लातूर – कल्याण” या जनकल्याण द्रुतगमी मार्गाची घोषणा; लातूर – मुंबई प्रवास होणार फक्त 5 तासांचा

1 min read

मुंबई दि.१७:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४४२ किमी लांबीच्या लातूर – कल्याण या द्रुतगती (Expressway) मार्गाची घोषणा केली आहे. लातूर – कल्याण द्रुतगती मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बनविण्याचे काम लवकरच सुरु होणार असून अंदाजित 35 हजार कोटी रु. खर्चून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या वतीने हा महामार्ग निर्माण केला जाणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिकरणासाठी आणि एकूणच कनेक्टिव्हिटीसाठी हा द्रुतगामी मार्ग नवसंजीवनी ठरणार आहे. या प्रकल्पाला जनकल्याण द्रुतगती मार्ग असे समर्पक नाव देण्यात आले आहे.‘लातूर ते कल्याण महामार्गावरील वाहनांना पुढे कल्याण वरुन मुंबईला जाताना वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागू नये यासाठी सदरील रस्त्यात किंचित बदल करून लातूर – अहिल्यानगर – माळशेज घाट मार्गे बदलापूर – वडोदरा एक्स्प्रेस वे वरील बोगद्यातून पनवेल जेएनपीटीला जोडण्यात यावे, जेणेकरून वाहनांना अटल सेतू किंवा मुंबई – गोवा द्रुतगती मार्गावरून मुंबईत जाता येईल’ यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे आणि औसा विधानसभा मतदार संघांचे आमदार अभिमन्यू पवार सातत्याने पाठपुरावा करत होतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तसे निवेदन दिले असता त्यांनी MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांना तपासून योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. आम्ही सुचवलेले बदल ग्राह्य धरूनच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहे. या संपूर्ण विषयात अनिलकुमार यांचीही महत्वाची आणि सकारात्मक भूमिका राहिली आहे. या प्रकल्पामुळे ठाणे जिल्ह्याच्या विकासाला वायुगती प्राप्त होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!