पुणे – नाशिक रेल्वेला जीएमआरटी चा अडसर
1 min read
बेल्हे दि.१२:- पुणे, नाशिक व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यातील ग्रामीण भागाला वरदान ठरू शकणा-या व गेल्या अनेक वर्षापासुन रखडलेला रेल्वे मार्ग बदलण्यात आल्याने जुन्नर तालुक्यातील नागरिकांनी केली नाराजी व्यक्त आहे.
गेल्या अनेक वर्षापासुन रखडलेला पुणे- नाशिक रेल्वे मार्ग हा पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल पुणे या ठिकाणी अंत्यंत कमी वेळेत पोहचु शकणा-या या रेल्वे मार्गाची अनेक वर्षापासुन मागणी असुन हा रेल्वे मार्ग पहिल्या ठरल्याप्रमाणेच व्हावा या साठी वेळोवेळी मागणी होत आहे.
या मार्गाची लांबी २६४.६० किलो मीटर असुन स्थानकांची संख्या २४ असुन यामध्ये २४ (१३ क्रॉसिंग आणि ११ ध्वज) आहेत तसेच पुणे या ठिकाणाहून सुटून हडपसर, मंजिरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, भोरवाडी, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकूर,
अंभोरे, संगमनेर, देवठाण, चास, दोडी, सिन्नर, मोहादरी, शिंदे आणि नाशिक रोड असा मार्ग असणार असुन ही वरील गावांची नावे रेल्वे स्थाणक म्हणुन प्रस्तावित करण्यात आली होती.परंतु केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी अधिवेशनात माहिती देताना सांगितले की जुन्नर तालुक्यात असलेल्या जीएमआरटीमुळे हा मार्ग बदलण्यात आला असल्याची माहिती दिली.
तसे पाहता हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर याचा फायदा विशेष करून ग्रामीण भागातील शेतक-यांणा तसेच पुणे तसेच नाशिक या ठिकाणी कामासाठी असलेल्या कामगारांणा होणार आहे. कारण शेतकरी वर्ग आपला शेती माल दररोज शहराच्या ठिकाणी विकण्यासाठी खाजगी वाहनाने विकण्यासाठी घेऊन जायचा असेल
तर सहा ते सात तास लागतात व यासाठी खर्चही खुप येत आहे व हाच माल रेल्वेने नेला तर अवघा दिड ते दोन तासाच पोचत असुन खर्चही खुप कमी येत आहे. तसेच मुंबई या ठिकाणी नोकरीसाठी असलेले ग्रामिण भागातील लोक आहे ते दररोज जाऊन येऊन करू शकतात व त्यांचा खर्चात देखील बचत होणार आहे.
हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर अहिल्यानगर पुणे, नाशिक जिल्हातील ग्रामीण भागातील शेतक-यांसाठी असलेल्या बाजारपेठ जवळ येणार आहेत. त्यामुळे हा मार्ग या तीनही जिल्ह्यातील शेतक-यांणा विकासाची नविन पर्व घेऊन येणार असुन महत्वाचा ठरणार आहे.
——
प्रतिक्रिया
पुणे- नाशिक रेल्वेमार्गाचा सतत पाठपुरावा केला असुन केंद्र सरकारने मार्ग बदलला असला तरी पुणे- नाशिक हा रेल्वे मार्ग पहिल्या ठरल्याप्रमाणे करण्यासाठी प्रयत्न करणार असुन वेळप्रसंगी आंदोलन करणार असल्याचे
सांगितले.
डॉ .अमोल कोल्हे खासदार शिरूर लोकसभा
——–
प्रतिक्रिया
‘केंद्र शासनाने पुणे नाशिक रेल्वे महामार्गाचा मार्ग बदलला असला तरी हा मार्ग पहिल्या ठरल्याप्रमाणेच करण्यासाठी प्रयत्न करणार असून यासाठी राज्यशासणामार्फत पाठपुरावा करणार आहे.
शरद सोनवणे, आमदार जुन्नर
——–
