श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे बेल्ह्यात स्वागत
1 min read
बेल्हे दि.१६:- श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र उत्तमापूर (ओतूर) ते श्री क्षेत्र पंढरपुर आषाढी वारी सोहळ्याचे सोमवार दि.१६ रोजी बेल्हे (ता.जुन्नर) नगरी मध्ये टाळ पखवाद विना व ताशाच्या स्वरात राम कृष्ण हरी च्या गजरात आगमन झाले. दुपारच्या विसाव्या साठी बेल्हे येथे शिवाजी भगवान डुंबरे यांच्या घरी आगमन झाले. तेथे श्रध्दा पेपर एजन्सीचे पांडूरंग संगमनेरकर भगवान साळुंके, बबुशा पिंगट व पिंगट यांनी स्वागत केले. वारकऱ्यांचे भजन झाले नंतर वारकऱ्यांना मसाला दुध व राजगिरा चिक्कीचे वाटप करण्यात आले.
पालखी सोहळ्याच्या वतिने शिवाजी डुंबरे यांना श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. तदनंतर पालखी पुढील मुक्कामा साठी माऊली तुकाराम व राम कृष्ण हरी च्या गजरात मार्गस्थ झाली.