मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा:- जयंत पाटील
1 min read
पुणे दि.११:- मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मोठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनीच केली आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना, दोन्ही राष्ट्रवादीचे वेगवेगळे वर्धापन दिन सोहळे होत आहेत. अशातच आता जयंत पाटील यांनी थेट प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची मागणी शरद पवारांकडे केल्याने, राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत.ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे. आपण तुकारामांच्या बाजूचे आहोत. भाजपचे आधी दोनच खासदार होते.
तो देशातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र काम करत रहायचंय. राज्याचं नेतृत्व आपण करु. आम्ही पदाधिकारी यांना निमंत्रण दिलं. कार्यकर्ते नाराज झाले. फोन आले. पावसाळ्याच्या कार्यक्रमाला सगळ्यांना बोलवून त्यांची अडचण नको म्हणून बोलवलं नाही.
प्रशांतने वेळ घेतली म्हणून पुण्यात कार्यक्रम. चांगलं त्याचं कौतुक. त्रुटींची जबाबदारी माझी.आता शिवभोजन थाळी बंद झाली आहे. अनाथांचे पैसे वळवण्याचं काम सरकारकडून होतंय. दोन कोटी रुपये एका पीएकडे सर्किट हाऊसला सापडले. जाहिर फक्त २ कोटी झाले. तीन वर्षे प्रशासकाकडून महापालिका चालवल्या जात आहेत.
मला शंका आहे जळगावला निवडणूक होणार नाही. पवार साहेबांना शिव्या घालायच्या, मग मूळ प्रश्न बाजूला राहतो… आता विनाकारण टीका पवार साहेबांवर चालू आहे. ओबीसींचं संरक्षण करण्याचं काम पवार साहेबांनी केलं आजही त्यांची हीच भूमिका आहे. आव्हाड जी… अभी भी पवार साहब का डर है. न्यायाधिशाकडे पैसे सापडले काहीच कारवाई नाही.