राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.९:- राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर २०२५ पर्यंत सौर ऊर्जेचा वापर सुरू करणार असून प्रधानमंत्री सूर्य घर योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील महाऊर्जा च्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केले.कार्यक्रमाला विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार मेधा कुलकर्णी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे , आमदार भीमराव तापकीर, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम आदी मान्यवर उपस्थित होते.

हरित इमारतीसाठी असलेली सर्व मानके पूर्ण करणारी, निसर्गाचा पूर्णपणे उपयोग करणारी, ऊर्जेची बचत करणारी आणि आवश्यक असणारी ऊर्जा १०० टक्के निर्माण करणारी, महाऊर्जाची ही नवी इमारत हरित इमारतीचा उत्तम नमुना आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाऊर्जाच्या प्रगती अहवालाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री यांनी अन्य मान्यवरांसह अपारंपरिक उर्जे संदर्भातील प्रदर्शनाला भेट दिली. सुरुवातीला त्यांच्या हस्ते महाऊर्जा कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे