साताऱ्यात होणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

1 min read

सातारा दि.९:- ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला आयोजनाचा मान मिळाला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ३२ वर्षांनंतर साताऱ्याला पुन्हा संधी मिळाली आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर संमेलन होणार असून जय्यत तयारी सुरू आहे. साहित्य रसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे