मान्सूनचा वेग मंदावणार,हवामान विभागाचा अंदाज

मुंबई दि.२९ – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच केरळमध्ये आठ दिवस तर महाराष्ट्रात बारा दिवस आधी दाखल झालेल्या मान्सूनने मुंबईत पोहेचण्याचा 117 वर्षांचा विक्रम मोडला.मात्र, 27 मे पासून म्हणजेच मंगळवारपासून मोसमी पावसाच्या प्रवासाची गती कमी होत आहे. शुक्रवारपासून (दि.30) आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, पुढील तीन दिवसांत घाट परिसरात मुसळधार, तर शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शुक्रवारपासून (दि.३०) आकाश ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.