देशात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू तर 1045 रूग्णांची नोंद

1 min read

नवीदिल्ली दि.२८:- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आत्तापर्यंत 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 45 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात महाराष्ट्रात सर्वाधिक 787 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर केरळ आणि गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. कोरोनाने देशात पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशात कोरोनाने झालेल्या मृत्यूमध्ये सर्वाधिक 5 मृत्यू हे महाराष्ट्रातले आहे. सोमावरी ठाण्यात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत ठाण्यात दोघांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या पुणे, मुंबई आणि ठाण्यात आहे. देशासह राज्यात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे