शेकडो वर्षात पहिल्यांदाच आणे घाटातील धबधबा मे महिन्यात वाहतोय ओसंडून

1 min read

आणे दि.२६:- जुन्नर तालुक्यातील आणे घाटातील धबधब्याला शेकडो वर्षात पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये पाणी सुरू झाले आहे. हा धबधबा शक्यतो जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होत असतो. परंतु यावर्षी मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे मे महिन्यातच धबधब्याला पाणी आले आहे. अशी वेळ शेकडो वर्षांनी यंदा पहिल्यांदाच आली असल्याची माहिती जाणकारांनी दिली.आणे घाटाच्या धबधब्याखाली असलेल्या गणेश पाझर तलावामध्ये २५ ते ३० टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या सात ते आठ दिवसापासून या भागात होत असलेल्या संततधार पावसामुळे धबधब्याला पाणी आले आहे. अनेक शेतामध्ये पाणी साठल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेत जमीन ओली झाली आहेत. त्यामुळे जमिनीला पाझर फुटला असून हा धबधबा वाहत आहे. या धबधब्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचा वातावरण दिसत असून पर्यटक मोठ्या आनंदाने या धबधब्याचा आनंद घेत आहेत. तर कल्याण अहिल्यानगर महामार्गावरती असणाऱ्या या घाटात धबधब्यामुळे निसर्ग सौंदर्य वाढले आहे. नयनरम्य रूप घाटात निसर्गाने धारण केले असून हे रूप पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे