जुन्नर तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान; बाजरी भुईसपाट

1 min read

आणे दि.२६:- जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या सात ते आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. मे महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्याच्या शेतमालाची नुकसान केले आहे. बांगरवाडी येथे रविवार दि. २५ रोजी सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे काही वेळातच नद्या नाल्याना पूर आला. अनेक भागांमध्ये पावसाने नुकसान केले असून आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळाने कैऱ्या पडल्याने हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हरवलेला आहे. तसेच उन्हाळी बाजरी भुई सपाट झाली आहे. गेले सात ते आठ दिवसापासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा पसरला आहे. काही ठिकाणी बीट काढणी चालू असल्यामुळे बीटाच्या शेतामध्ये पाणी साठल्याने काढणी खोळंबली आहे. तसेच कांद्याच्या शेतामध्ये सुद्धा पाणी साठल्याने असल्याने कांदा सोडू लागला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे