तीन महिन्यांत महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार:- किरीट सोमय्या

1 min read

मुंबई दि.२४:- काही महिन्यांपूर्वी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. यावरून मनसेच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन आणि मोर्चेदेखील काढण्यात आले होते. यावरून चांगलेच राजकारण तापल्याचेही पाहायला मिळाले होते. यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात एक मोठा दावा केला असून, आता पुढील एका महिन्यात मुंबई आणि त्यानंतर पुढच्या तीन महिन्यांत महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.आज एका महत्त्वाच्या विषयावरील निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या पोलीस महासंचालकांनी मशिदीवरील अनधिकृत
भोंगे हटवण्याचे आदेश दिले आहेत. मी स्वतः ५० पोलीस ठाण्यात जाऊन आलो आहे. मुंबईमध्ये एका महिन्यात सर्व मशिदीवरील भोंगे खाली येतील. तसेच पुढच्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्र भोंगे आणि लाऊडस्पीकर मुक्त होईल, असा दावादेखील सोमय्या यांच्या वतीने करण्यात आला आहे. सोमय्या पुढे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे, त्या निर्णयाचे पालन नक्की होईल. मात्र, काही माफिया धर्माच्या नावावर भोंगे वाजवत होते. भोंगे वाजवण्याची परवानगी कोणालाही नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे