आपत्ती निवारण ही आपणा सर्वांची जबाबदारी:- मुख्यमंत्री फडणवीस

1 min read

मुंबई दि.२२:- मान्सून काळात एखादी आपत्ती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. त्यादृष्टीने सर्वच यंत्रणांनी योग्य तयारी केली आहे. मान्सून काळात जीवित व मालमत्तेचे नुकसान रोखण्यासाठी काम करावे,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत सांगितले.आपत्ती निवारण ही आपणा सर्वांची जबाबदारी असून आपत्ती वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्वाचे आहे. आपत्ती काळात सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी जबाबदारी म्हणून मुख्यालयाच्या संपर्कात राहून २४ तास शनिवार व रविवारीही दक्ष राहून काम करावे.आपत्तीच्या काळात तातडीने प्रतिसाद द्यावा असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.आपल्यासाठी प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. सर्व महानगरपालिकांनी नाले सफाई करावी. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंप बसवावेत, मुंबईत दरड प्रवण भागात डोंगरकड्यांना जाळ्या बसवाव्यात, धोकादायक ठिकाणी फलक लावावेत, पोलिसांनी अशा ठिकाणी जाण्यापासून पर्यटकांना रोखावे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह नौदल, वायुलद, सैन्यदल, सागरी सुरक्षा दल, एनडीआरअफ, एसडीआरएफ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अधिकारी आणि सर्व संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे