बियाणे, खते याचा तुटवडा शेतकऱ्यांना भासणार नाही:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

1 min read

मुंबई दि.२२:- राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा व खतांचा साठा उपलब्ध असून बियाणे, खते याचा तुटवडा शेतकऱ्यांना भासणार नाही. मागील वर्षांचा कल पाहता कुठले पीक कुठे कमी-अधिक प्रमाणात घेता येईल, याचा विचार करूनच त्‍या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे. -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसबोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्राने केंद्र शासनाच्या ‘साथी’ पोर्टलवर बियाणे नोंदणी करण्याचा नियम केला आहे. यामुळे हे बियाणे ट्रेसेबल होणार आहे. बोगस बियाणांबाबत कठोर पावले उचलण्यात येत असून यावर्षीपासून सर्व बियाणांची माहिती’साथी’ या पोर्टलवर आणण्याचा निर्णय-मुख्यमंत्री लिंकिंग संदर्भात अतिशय कडक निर्णय घेण्यात आलेला आहे. एखाद्या कृषी केंद्रांनी पुरवठादार कंपन्याच्या सूचनेवरून खतांचे लिंकिंग केल्याचेनिष्पन्न झाल्यास अत्यावश्यक वस्तू कायदा किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. कृषी विभागाच्या राज्यस्तरीय खरीप हंगाम नियोजन आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री ॲड.माणिक कोकाटे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे