स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका थांबवा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल:- बाळासाहेब औटी

1 min read

राजुरी दि.१९:- महावितरण ने महाराष्ट्रातील सर्वसामान्य घरगुती व ३०० युनिट पेक्षा कमी वीज वापरणारे छोटे व्यावसायिक व औद्योगिक ग्राहक यांना जबरदस्तीने कसलाही विचार न करता वरिष्ठांनी घेतलेल्या तथाकथित एकतर्फी धोरणात्मक निर्णयाची भीती घालून ग्राहकांना नको असलेले नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका सुरू केला आहे. तो तात्काळ थांबविण्यात यावा अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा कडक इशारा अखिल भारतीय प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी यांनी राजुरी या ठिकाणी दिला.स्मार्ट मीटर बसुन घ्यायला वीज ग्राहकांचा तीव्र विरोध या मागणीसाठी वीज ग्राहकांचे तक्रार भरो आंदोलन राजुरी (ता.जुन्नर) या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित वीज ग्राहकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी गावचे उपसरपंच माऊली शेळके, एम.डी.घंगाळे, वल्लभ शेळके, जयसिंग औटी, ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हा संघटक अशोक भोर, सचिव ज्ञानेश्वर उंडे, जगन्नाथ खोकराळे, शैलेश कुलकर्णी, कौशल्या फापाळे, राजेंद्र औटी, गेनभाऊ हाडवळे, नामदेव हाडवळे, मुरलीधर औटी, शाकीर चौगुले, निलेश हाडवळे, मोहन नायकवडी, अनिल रायकर, संदीप औटी, साईनाथ हाडवळे, गणेश हाडवळे,आकाश उंडे, महावितरणचे आळेफाटा येथील उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे, बेल्हे येथील सहायक अभियंता कृष्णा कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी औटी म्हणाले की विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने घरगुती ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणार नसल्याची घोषणा केली होती. परंतु आता महावितरण कडून या मीटरचे नाव टि ओ डी (टाइम ऑफ डे) असे बदलून सर्व ग्राहकांकडे सक्तीने लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. खुद्द तात्कालीन उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मीटर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा विधानसभेत केली. मात्र असे असताना देखील महावितरण कंपनीने जुने मीटर काढून नवीन मीटर लावण्याचा बेकायदेशीर धडाका सुरू केला आहे. महावितरण ने राज्यातील २.४१ कोटी ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यभरातील ग्राहक संघटना, नागरिकांकडून विरोध वाढल्यानंतर तात्कालीन ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे मीटर घरगुती ग्राहकांकडे लावणार नसल्याची घोषणा केली होती. मात्र मीटर ग्राहकाकडे सत्तेने लावले जात आहेत स्मार्टफोन का नको असा सवाल यावेळी करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे