सर्पदंश झाल्यास वेळेत औषधोपचार घेण्या:- डॉ. सदानंद राऊत
मुंबई, दि.१०: ग्रामीण, डोंगरी भागात सर्पदंशाच्या घटना घडत असतात. अशा वेळी सर्पदंश झाल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वेळेत योग्य औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. सदानंद राऊत यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून केले आहे.आपल्याकडे पावसाळ्यात सर्पदंशाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर दिसून येताता. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस मोकळ्या, स्वच्छ जागी हलवणे, त्याला दिलासा देणे आवश्यक आहे. कारण बऱ्याचदा साप बिनविषारी असतो. मात्र, केवळ भयाने आणि अंधश्रधेमुळे रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो.
अशा वेळी सर्पदशं होऊ नये म्हणून नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, तसेच सर्पदंश झाल्यास कोणते औषधोपचार घ्यावेत याबाबत सविस्तर माहिती डॉ. सदानंद राऊत यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत, आज बुधवार दि.१०, गुरूवार दि. ११ मे २०२३ रोजी सकाळी ७. २५ ते ७. ४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲप वर प्रसारित होणार आहे. ही मुलाखत निवेदक सुषमा जाधव यांनी घेतली आहे.