सर्व डाळी सरकार हमीभावाने खरेदी करणार; केंद्र सरकार चा निर्णय

नवी दिल्ली दि.२८: – तूर, मसूर आणि उडदाचे जेवढे उत्पादन होईल ते सर्व किमान हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. याकरता शेतकऱ्यांना नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघाच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. शेतकऱ्यांना तूर, मसूर आणि उडदाचा योग्य भाव मिळावा.याकरता राज्य सरकारांनी प्रभावी आणि पारदर्शी खरेदी पद्धत राबवावी असे आवाहन त्यांनी केलं.
येत्या ४ वर्षांत या अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता साध्य करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात निश्चित करण्यात आले आहे. केंद्र सरकारने चालू रबी हंगामात ३७ लाख ३९ हजार टन कडधान्यांच्या तर २८ लाख २८ हजार टन राईच्या खरेदीला मान्यता दिली आहे.
अशी माहिती त्यांनी दिली. खरिपातली तूर खरेदी २ लाख ४६ हजार टनपर्यंत झाली असून त्याचा फायदा १ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना मिळाला आहे.