मध्यप्रदेशच्या बालाघाट जंगलात पोलीसांच्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

1 min read

इंदूर दि.२०:- मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक गढी पोलीस ठाणे क्षेत्रातील रौंदा जंगलात झाली आहे. या जंगलात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. पोलिसांनी चकमकीत नक्षलवाद्यांचे हत्यारे आणि साहित्य जप्त केलं आहे.जंगलातील चकमकीदरम्यान काही नक्षलवादी जखमी झाले. या घनदाट जंगलाचा फायदा उचलून काही नक्षलवाद्यांनी पळ काढला. जखमी नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांनी या सर्च ऑपरेशनमध्ये हॉक फोर्स,सीआरपीएफ, कोबरा कमांडो आणि इतर पथकांचा सहभाग नोंदवला. एकूण १२ हून अधिक पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी या पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलीस आणि हॉक फोर्सचे जवान रौंदा येथील घनदाट जंगलात शोधमोहिम राबवत होते, यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी पोलिस दलावर गोळीबार सुरू केला. जवानांनी लगेच प्रत्युत्तर दिले, ज्यात 4 महिला नक्षलवादी ठार झाल्या.

ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून एक इन्सास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक 303 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. चकमकीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. जंगलातील चकमकीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जंगलात पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बालाघाट जिल्ह्यातील पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. पोलिसांनी महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे