आणे- पठारावर दुष्काळाचा काळात मदत करण्याचे काम फक्त सत्यशिल शेरकर यांचेच:- माजी सरपंच रोहीदास शिंदे

1 min read

आणे दि.९:- आणे- पठारावर दुष्काळाचा काळात मदत करण्याचे काम फक्त सत्यशिल शेरकर यांनीच केले आहे असे प्रतिपादन शिंदेवाडी गावचे माजी सरपंच रोहीदास शिंदे यांनी केले.महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांच्या प्रचार दौरा राजुरी-बेल्हा जिल्हा परिषदेच्या गटात आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी शिंदेवाडी गावातील मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी उमेदवार सत्तशिल शेरकर, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जेष्ठ नेते शरद लेंडे, शरद पवार गटाचे नेते अनंत चौगुले, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष तुषार थोरात पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत घोडके, वल्लभ शेळके, खरेदी विक्री संघाचे संचालक लहु गुंजाळ, अशोक घोडके, खंडु बेलकर, बाबाजी शिंदे , गोरक्षनाथ शिंदे, हनुमान शिंदे, जाणकु डावखर,बेल्हे गावचे माजी सरपंच महेश बांगर, मोहन बांगर,आनंदा बेलकर, संतोष वाव्हळ,पांडुरंग गाडेकर, पंकज भोसले, जिजाभाऊ बेलकर, गणपत बेलकर इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.शिंदे म्हणाले की शरद पवार यांनी दिलेला उमेदवार सत्तशिल शेरकर यांना गोरगरीब जणतेची जान असुन शिंदेवाडी हे शरद पवार साहेबांच्या विचारांचे गाव आहे तसेच आपल्या विभागाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या माध्यमातून आमचा विजेचा प्रश्न मिटला आहे.शेरकर म्हणाले भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातले सरकार असुन शेतीच्या पिकाला कुठल्याही प्रकारे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. तसेच ज्यांच्या नावावर तुम्ही गेल्या निवडणुकीत निवडुन आलात त्यांनी विकासाची भाषा बोलु नये. व भाजप पक्ष हा जातीपातीचे राजकारण करत असल्याने त्यांना घरी बसवण्याची हिच वेळ आहे असे सांगितले. पेमदरा गावचे माजी सरपंच आनंदा बेलकर म्हणाले की जून्नर तालुक्याच्या पुर्व भागातील शिवसैनिक हे महाआघाडीचे उमेदवार सत्यशिल शेरकर यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे