‘या’ चुका पाणी पिताना टाळा

1 min read

जुन्नर दि.२६:- दिवसभरात प्रत्येकाने २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी पिताना बहुतेक जण चुका करतात. खालील चुका टाळा

जेवणाबरोबर पाणी पिणे
जेवणादरम्यान पाणी प्यायल्यास अन्नाचे विघटन करणे खूप कठीण होते. त्यामुळे पाणी तुम्ही जेवणाच्या एक तास आधी किंवा एक तास नंतर प्या.

खूप वेगात पाणी पिणे
जेव्हा तुम्ही घाईघाईत गटागट पाणी पिता तेव्हा शरीराला एक छोटासा धक्का बसतो. त्यामुळे शांतपणे एक-एक घोट पाणी प्या. पाणी गिळण्यापूर्वी फक्त दोन-तीन सेकंद तोंडामध्ये धरून ठेवा आणि नंतर हळुवारपणे ते गिळा.

खूप गरम किंवा खूप थंड पाणी पिणे
सामन्य तापमानाचे पाणी प्या. जर खूप गरम किंवा खूप थंड पाणी प्यायले, तर तुमच्या शरीराला प्रथम त्या पाण्याला सामान्य तापमानावर आणण्यासाठी आणि नंतर त्यावर प्रक्रिया करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते.

प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिणे
उष्णतेमध्ये ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या मायक्रोप्लास्टिक्स सोडतात,जे पाण्यात उतरतात. त्यामुळे त्यातून पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.“कोमट पाणी हे आवश्यक आहे, तर बर्फाचे थंड पाणी पिणे टाळावे. आयुर्वेदानुसार बर्फाचे थंड पाणी पचनक्रियेतील अग्नी विझवते आणि पचनसंस्थेतील असंख्य समस्या निर्माण करते. कोमट पाणी त्वचा स्वच्छ करते आणि मुरमे काढून टाकते. हे त्वचा स्वच्छ करणारे आहे, जे मुरमांच्या समस्या असलेल्या महिला आणि पुरुष दोघांनीही प्यावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!