वर्षातून दोनदा सीबीएसई दहावीची परीक्षा
नवी दिल्ली, दि.२६: – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई वर्ष २०२६ पासून दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा घेणार आहे. या नव्या नियमांना सीबीएसईने मान्यता दिली. ही माहिती परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी दिली आहे. या परिक्षेमधील पहिला टप्पा फेब्रुवारीमध्ये आणि दुसरा टप्पा मे मध्ये होईल.
दहावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेच्या पहिल्या टप्प्यात बसणे अनिवार्य आहे, दुसरा टप्पा पर्यायी असेल. अंतर्गत मूल्यांकन फक्त एकदाच केले जाईल. या निर्णयानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण सुधारण्याची संधी मिळेल. जर एखाद्या विद्यार्थ्याचे गुण पहिल्या टप्प्यात कमी पडले.
तर तो दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करून सुधारणा करू शकेल. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी) दोनदा परिक्षेची शिफारस करण्यात आली आहे.संयम भारद्वाज म्हणाले, दोन्ही टप्प्यांचे निकाल अनुक्रमे एप्रिल आणि जूनमध्ये जाहीर केले जातील. विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित,
सामाजिक विज्ञान आणि भाषा यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये त्यांची कामगिरी सुधारण्याची परवानगी असेल. मंजूर केलेल्या नियमांनुसार, हिवाळी सत्रात सहभागी होणाऱ्या शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही टप्प्यात बोर्ड परीक्षेला बसण्याचा पर्याय मिळेल. अंतर्गत मूल्यांकन शैक्षणिक सत्रादरम्यान फक्त एकदाच घेतले जाईल.
सीबीएसईने फेब्रुवारीमध्ये मसुदा नियमांची घोषणा केली होती. नंतर ते भागधारकांच्या अभिप्रायासाठी सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवण्यात आले होते. हा निर्णय नवीन शिक्षण धोरणाच्या शिफारशींशी सुसंगत आहे, ज्यानुसार, बोर्ड परीक्षांमधील उच्चस्तरीय पैलू दूर करता येतील. सर्व विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक वर्षात दोन वेळा परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल.
