ऐतिहासिक निर्णय,तुकोबांच्या रथ बैलजोडी परंपरेत बदल

1 min read

देहू दि.२१:- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी सोहळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे.

त्यासाठी देहू संस्थानच्या तयारीला वेग आला आहे. यावर्षी देहू संस्थांनकडून एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी तुकोबांच्या पादुका पंढरपूर ला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात आणि हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोडयांना हा मान दिला जायचा.परंतु यावर्षी पासून देहू संस्थानने बाहेरून बैलजोडी न मागवता थेट संस्थानच्या मालकीची बैलजोडी खरेदी करून ती रथाला जुंपण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी पासून बैलजोडी साठी अर्ज मागविण्यात येणार नसून थेट पालखी सोहळ्याला संस्थानच्या मालकीच्या बैलजोडी तुकोबांचा पालखी रथ ओढणार आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे