विनापरवाना केबल टाकणारांवर होणार कारवाई
1 min read
अहिल्यानगर दि.२०:-शहरातील महापालिकेच्या मालकीच्या पथदिव्यांच्या खांबावरील इंटरनेट व टीव्ही केबल, तसेच इतर संबंधितांनी तत्काळ केबल काढून घ्याव्यात. महापालिकेने विनापरवाना केबल टाकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. विनापरवाना केबल हटवण्यात येत आहेत. त्यामुळे संबंधितांनी तत्काळ अनधिकृत केबल काढून घ्याव्यात, अन्यथा कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे.
अहिल्यानगर शहरात सर्वत्र महापालिकेचे पथदिव्यांचे खांब आहेत. शहरातून जाणाऱ्या प्रमुख रस्ते व महामार्गांवरही पथदिव्यांचे खांब आहेत. अनेक टीव्ही केबल कंपन्या व इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांकडून त्यांच्या केबल टाकण्यासाठी बेकायदेशीरपणे महापालिकेच्या खांबांचा वापर केला जात आहे. धोकादायक पद्धतीने या केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.