कालवा सल्लागार समितीने घेतलेला निर्णय बेकायदेशीर:- पिंपळगाव माजी आमदार अतुल बेनके
1 min read
जुन्नर दि.१९:- जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगे धरणाच्या अचलसाठ्यातून जवळपास 3. 5 टीएमसी पाणी काढण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला आहे. या बेकायदेशीर आणि अन्यायकारक निर्णयाला जोरदार विरोध करत कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग, नारायणगाव यांना माजी आमदार अतुल बेनके व इतर कार्यकर्त्यां कडून निवेदन देण्यात आले. अचलसाठ्यातील पाणी काढल्यास पिंपळगाव जोगे धरणाचे लाभधारक शेतकरी गंभीर अन्यायाला सामोरे जातील, आणि पुढील वर्षी धरण भरल्याशिवाय आवर्तन अशक्य होईल. प्रथम न्याय मिळावा तो धरण लाभधारक शेतकऱ्यांना. त्यांच्या पाण्यावर अन्य कोणीही हक्क सांगू शकत नाही.
माणुसकीच्या दृष्टीने आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, आम्ही अडीच टीएमसी पाणी देण्यास तयार आहोत. परंतु त्यापेक्षा अधिक पाणी दिल्यास आमच्या शेती हंगामाचे नुकसान होणार असून, याची जबाबदारी संपूर्णपणे कालवा सल्लागार समितीवर राहील.
कालवा सल्लागार समितीने हा अन्यायकारक निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि तो लाभधारकांवर थोपवू नये, हेच आमचं ठाम आणि स्पष्ट आव्हान आहे.अशी माहिती तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी दिली.