8 लाख लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपयांचा हफ्ता मिळणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांची स्पष्ट भुमिका
1 min read
मुंबई दि.१६:- महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन वातावरण तापलं आहे. त्यामागील कारणदेखील तसंच आहे. विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेतून जवळपास 2 कोटी महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दर महिन्याला केली जात होती. तसेच निवडणूक काळात महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची मदत देऊ, अशी घोषणा केली होती.
यानंतर राज्यात महायुतीचंच सरकार आलं. पण त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे निकष पाळले जात आहेत की नाही? यासाठी अर्जांची छाननी सुरु करण्यात आली. या छाननीतून लाखो महिला याआधीच अपात्र ठरल्या आहेत. त्यानंतर आता आणखी मोठी बातमी समोर आली आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या 8 लाख महिलांना 1500 ऐवजी केवळ 500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. असे समजते. यावरुन विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधला जातोय. त्यानंतर अर्थमंत्री अजित पवार आणि महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
आमचं म्हणणं आहे की, कुठल्याही एका योजनेचा लाभ घ्यावा. महिलांना केंद्राची योजना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थात काही संबंध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे.
हा लाभ मिळत नसेल तर दीड हजार रुपयांचा लाभ घ्यावा. कुठला लाभ मिळवायचा ते निश्चित करण्याचं आपण आपल्या लाडक्या बहिणींवर सोपवलं आहे”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. “दिनांक २८ जून २०२४ व दिनांक ३ जुलै २०२४ रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या
महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत १५०० रुपये दरमहा सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे. तसेच, इतर शासकीय योजनांचा १५०० रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे.
त्याच शासन निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दरमहा १००० रुपये लाभ घेत असलेल्या ७७४१४८ महिलांना उर्वरित फरकाचे ५०० रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे”, असं स्पष्टीकरण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलं. लाडक्या बहिणींनीच सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत.
ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मते विकत घेतली, त्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर आली आहे. ती उद्या शुन्य रुपयांवर येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत.
पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही. त्याचं कारण गेल्या साडेतीन वर्षात या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली आहे”, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. यानंतर सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे.