ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व केले औक्षण; परीक्षेच्या दिल्या शुभेच्छा
1 min read
आळेफाटा दि.११:- ज्ञान मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आळे मध्ये आज पासून सुरू होणाऱ्या 12 वी बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन व त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे सर्व पदाधिकारी अजय कुऱ्हाडे अध्यक्ष, सौरभ डोके उपाध्यक्ष, अर्जुन पाडेकर सचिव, अरुण हुलवळे खजिनदार, बाळासाहेब जाधव उद्योजक, भाऊ कुऱ्हाडे माजी अध्यक्ष, उल्हास सहाणे माजी उपाध्यक्ष,
बबन सहाणे माजी उपाध्यक्ष, बाबुराव कुऱ्हाडे, दिनेश सहाणे उपसरपंच कोळवाडी, कैलास शेळके, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे , शांताराम कुऱ्हाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी संस्थेचे सर्व सदस्य ग्रामस्थ आळे, संतवाडी, कोळवाडी हे उपस्थित होते. यांनी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
परीक्षेची आवश्यक असणारी सर्व तयारी पूर्ण झाल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी व उपप्राचार्य सुरेश कुऱ्हाडे यांनी सांगितले. आळे केंद्र क्रमांक 0184 येथे एकूण विद्यार्थी 866 परीक्षार्थी म्हणून परीक्षा देणार आहेत. सदर केंद्रावर ज्ञानमंदिर कनिष्ठ महाविद्यालय आळे शाळेचे 580 विद्यार्थी, विद्या विकास मंदिर राजुरी शाळेचे 128 विद्यार्थी, ज्ञानराज इंग्लिश मीडियम स्कूल आळे शाळेचे 49 विद्यार्थी, जे. आर. इंग्लिश मीडियम स्कूल शाळेचे 47 विद्यार्थी, सद्गुरु सिताराम महाराज विद्यालय पिंपरी पेंढार शाळेचे 40 विद्यार्थी आणि विद्यानिकेतन साकोरी शाळेचे 22 विद्यार्थी इयत्ता बारावीची परीक्षा देणार आहेत.
केंद्र संचालक म्हणून राजेंद्र भालेराव, उपकेंद्र संचालक लांडगे मच्छिंद्र, खतोडे बाबासाहेब आणि सुनिता दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कॉपीमुक्त, शांततेत, कडक व शिस्तप्रिय वातावरणात परीक्षा पार पाडणे ही या केंद्राची पहिल्यापासूनच ओळख आहे.
त्यासाठीच कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत जनजागृती सप्ताह महाविद्यालयात यापूर्वीच आयोजित करण्यात आला होता. परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व गैरप्रकार टाळण्यासाठी यावर्षी महाविद्यालयाकडून विशेष प्रयत्न करण्यात आळे आहेत. परीक्षा केंद्राच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात टेलिफोन, फॅक्स केंद्र, झेरॉक्स सेंटर,
ई-मेल- इंटरनेट सुविधा, लॅपटॉप- मोबाईल प्रसारमाध्यमे अथवा इतर संपर्क साधने बंद ठेवण्यात आली आहेत. परीक्षा काळात महाविद्यालय परिसरात कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्ती समूहाला प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. सदरचे आदेश न पाळणाऱ्या व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 223 प्रमाणे कार्यवाही करण्यात येऊ शकते.
या वर्षी संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोनची नजर असणार असून परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार करणारे, त्याला प्रवृत्व करणारे, मदत करणारे यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल केले जाणार असून केंद्रापासून 500 मी अंतराच्या परिसरात कलम 144 लागू केले गेले आहे. संपूर्ण परिक्षा केंद्रावर सी सी टी व्ही ची नजर असणार असल्याची माहिती प्राचार्य संदीप भवारी यांनी दिली.