सद्गुरू पालखी सोहळ्याचे प्रस्थान ४ फेब्रुवारीला

1 min read

पिंपळवंडी दि.३१:- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांची संजीवन समाधी श्री क्षेत्र ओतुर येथे आहे. माघ शुद्ध दशमी ला झालेल्या अनुग्रह दिनाचे औचित्य साधुन संपन्न होणाऱ्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंगळवार (दि.४) रोजी सकाळी सात वाजता होणार असून वाघजाई नगर, शिरोली, पेठ, मंचर, नारायणगाव, ओझर मार्गे ओतुर ला शुक्रवार (दि.७) रोजी दुपारी १२ वाजता चैतन्य समाधी जवळ समारोप होईल. अशी माहिती ह.भ.प. राजू भसे यांनी दिली. चिदंबर स्वरूप प.पु.उमाकांतभाऊ कुलकर्णी यांचे प्रेरणेने सुरू झालेला पालखी सोहळा सद्गुरू ताईंच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणाऱ्या शिव चिदंबर सेवा समिती आयोजित पालखी सोहळ्याचे हे बारावे वर्षे असुन तपपुर्ती सोहळ्याचे वीणापुजन तुकोबा रायांचे वंशज व मा.अध्यक्ष ह.भ.प रामदास महाराज मोरे , हभप. माणिक महाराज मोरे व पादुका पुजन देहू संस्थान चे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या शुभहस्ते होणार असून ह.भ.प. योगेश महाराज शिर्के, गणेश महाराज घोडेकर, गणेश महाराज शिंदे यांची पालखी तळ मुक्कामी किर्तन होणार आहे. समारोप प्रसंगी वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे यांचे समारोप किर्तन होणार आहे. ना.गाव मार्केट कमिटी मध्ये भव्य रिंगण सोहळा संपन्न होईल.बहुसंख्येने वारकरी बांधवांनी सदर पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन चिदंबर सेवा समिती वतीने करण्यात येत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे