आमदार अतुल बेनके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी

1 min read

Oplus_131072

जुन्नर दि. २९:- जुन्नर विधानसभेसाठी तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचा सोमवार दि .२८ रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्त्यांनी खरेदी केली होती. या गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

यावेळी अभिनेते सयाजी शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, पांडुरंग पवार, पापा खोत, युवा नेते अमित बेनके, रोहिदास केदारी, उज्ज्वला शेवाळे, भाऊ कुंभार, रामदास अभंग, गणेश वाजगे, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीसाठी तालुक्यातील अनेक जण उभे आहेत. परंतु तालुक्यातील जनतेसाठी विरोधकांनी काय केले? मला कोणाला हरवायचे नाही तर मला जुन्नर तालुक्याला जिंकायचे आहे.

आम्ही दिवस-रात्र जनतेच्या विकासाची कामे केली आहे. विरोधक भावनेचा आधार घेऊन निवडणूक लढवणार असाल तर जुन्नर तालुक्यातील जनता कधीही माफ करणार नाही, असे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धान्यबाजार येथे झालेल्या सभेत आमदार बेनके बोलत होते. आमदार बेनके म्हणाले की, जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीत पाच वर्षांपूर्वी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून बहुसंख्य मताने निवडून दिले तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी पाच वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली.

जुन्नर तालुक्याचा सेवक म्हणून काम करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या राज्याची शिकवण दिली त्याचा अंगीकार केला. जुन्नर तालुका सुसंस्कृत होण्यासाठी आहोरात्र कष्ट करणार्या वारकरी संप्रदायाला मदत केली.

बेनके कुटुंबाला वारकरी संप्रदायाने फार मोठी साथ दिली. १ लाख १ हजार ३७ महिलांना माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत आर्थिक निधी मिळवून दिला.

आमदार अतुल बेनके यांनी मागील पाच वर्षांत तालुक्यातील गावागावांत विकासकामे केलेली आहेत. कृषी क्षेत्रात क्रांती केलेला तसेच राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून या तालुक्याचे नाव राज्यात चर्चेत आहे. मतदारसंघाचा विकास काय असतो हे मागील तीन वर्षांत आमदार बेनके यांनी विकासकामे करून दाखवून दिले आहे.

पाणीदार आमदार म्हणून त्यांनी आपली ओळख कामातून करून दिलेली असून हिरडा कारखाना, बिबट सफारी, कुकडेश्वर मंदिर निधी या मोठ्या प्रकल्पांकरिता भरीव निधी शासनाकडून मंजूर करून आणला आहे. असे शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलताना आपल्या भाषणात सांगितले.

आद्य क्रांतिकारी राघोजी भांगरे व तालुक्यातील महामानवांसाठी काम केले. मुस्लीम समाजाला निधी दिला. बौद्ध समाजासाठी विकासाचीकामे केली. जुन्नर तालुक्याच्या पाण्याचे रक्षण केले.चिल्हेवाडीच्या पाइपलाइनसाठी १०० कोटी मंजूर केले. स्व. वल्लभ बेनके यांच्या काळातील आणि त्यांच्या मनातील तालुक्याच्या विकासाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे