पुण्यात एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना टपरी जवळ चहा पिताना कारने उडवले

1 min read

पुणे दि.१:- स्पर्धा परीक्षेचा तयारी करणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना पुण्यातील सदाशिव पेठेत एका कारने उडविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.ही घटना संध्याकाळी साडे पाच वाजता घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल जवळ ही घटना घडल्याचे समजते. अपघातात जखमी झालेले सर्व विद्यार्थी एमपीएससीची तयारी करणारे होते. या विद्यार्थ्यांवर पुण्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे.पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. इथे एमपीएससीचा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी राज्यभरातून येतात. अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन पुण्यात दिवस-रात्र अभ्यास करतात. हे विद्यार्थी तासंतास पुण्यातील अभ्यासिकांमध्ये अभ्यास करत बसलेले असतात. पण आज अशाच काही विद्यार्थ्यांना खूप दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागलं आहे. या घटनेमुळे विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.शनिवारी सायंकाळी सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ असलेल्या नाथसाई या चहाच्या दुकानात विद्यार्थी चहा घेण्यासाठी थांबले होते. तेव्हा भरधाव वेगाने आलेल्या टुरिस्ट गाडी हुंडाईने या १२ जणांना उडवले. दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. सर्व जखमींना संचेती आणि मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे