संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडेंनी मौन सोडलं

1 min read

नागपूर दि.२१:- बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांंची निर्घुण हत्या करण्यात आली. यामध्ये धनजंय मुंडे यांचे स्नेही वाल्मिक कराड यांचं नाव समोर येत आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली जात आहे. आज सभागृहात हा विषय मांडला गेलेला असताना धनंजय मुंडे सभागृहात हजर नव्हते. त्यावरूनही मोठी चर्चा झाली. या सर्व प्रकरणावर अखेर धनंजय मुंडे यांनी मौन सोडलं असून त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.“माझ्या सहकाऱ्याच्या संबंधात चर्चा सुरू होती, त्यावर उत्तर मुख्यमंत्री देणार होते, त्यामुळे प्रथा परंपरेनुसार मी सदनात उपस्थित राहिलो नाही. मी उपस्थित राहिलो असतं त्यांना उत्तर देताना अडचण झाली असती. त्यामुळे एकदाच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जावं म्हणून मी सभागृहात हजर नव्हतो, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.“मी सुरुवातीपासून म्हणतोय की हे व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे. अतिशय निर्घृण हत्या संतोष देशमुखांची झाली. या हत्येचं समर्थन कोणीच करू शकत नाही. आता सर्वच आरोपींना अटक झाली आहे. या प्रकरणी आमच्या सर्वांच्या तीव्र भावना होत्या. आता एसआयटी नेमली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास होणार आहे. आदल्यादिवशी गुन्हेगार आणि संतोष देशमुख यांचा भाऊ आणि पोलीस ऑफिसर यांचा चहा पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचीही चौकशी होणार”, असं धनंजय मुंडे म्हणाले.“ माझ्या नावाशी आरोप जोडणं असे प्रकार सदनात अनेकदा घडले आहेत. विरोधी पक्षनेत्याने काय बोलावं हे मी सांगू शकणार नाही. पण अंबादास दानवे यांनी वाल्मिक कराड कुठे आहेत हे सांगितलं असतं तर तर त्यालाही अटक केली असते”, असंही ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे